रविवार, १८ एप्रिल, २०२१

कोविड काळातील शिक्षण आणि पालक

 कोविड काळातील शिक्षण आणि पालक

श्री. शरद लक्ष्मण पांढरे, शहापूर 


कोविड १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेला लॉकडाऊनमुळे  खरंतर संपूर्ण जगच काही महिने जणूकाही थांबलं होतं. स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अगदी मार्च महिन्याच्या मध्यापासून शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात जोडून ठेवणे, त्यांना मानसिक आधार देणे, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करणे, स्वयंअध्ययनासाठी मुलांना कसं प्रेरित करता येईल यासारखी नवी आव्हाने उभी राहिली. यावर उपाय योजना करण्यात राज्यभरातील असंख्य शिक्षक पुढे सरसावले. नवीन पायवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. 

         अगदी एप्रिल महिन्यापासूनच त्यांनी  व्हाट्सअँप ग्रुप करून विद्यार्थ्यांना कोरोना संकटाच्या लॉकडाऊन कालावधीत उपलब्ध साहित्याचा वापर करून अभ्यास कसा करावा यासाठीची व्हिडिओ मालिका सुरू केली व ते या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले. आपल्या बऱ्याच शिक्षकांनी अगदी आपल्या दुर्गम भागातील व वाड्यापाड्यांवरील  आदिवासी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांना या संकटकाळात मानसिक आधार दिला.

 या संकट काळात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून यूट्यूब चॅनेलवर व ब्लॉगवर शेअर करत आहेत व त्याच्या लिंक्स केवळ आपल्याच विद्यार्थ्यांपूरत्या मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांना व्हाट्सअँप द्वारे पाठवून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.  दर्जेदार मार्गदर्शन व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार करून पाठवत आहेत. इतर अध्ययन पूरक शैक्षणिक मार्गदर्शन सर्वच जण करत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना एकाच वेळेस मोबाईल व नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन वर्ग घेण्यास इच्छाशक्ती व क्षमता असूनही अडचणी येत आहेत.  परंतु आपल्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन पोहचत नाही हे लक्षात आल्यानंतर वाड्यापाड्यांवर प्रत्यक्ष भेटी देऊन ऑफलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन व्हिडिओ व ऑडिओ उपलब्ध करून देत आहेत. स्वतःचे लॅपटॉप व मोबाईल यांच्याद्वारे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

‘चालू शैक्षणिक वर्षांत दरवर्षी जूनमध्ये सुरू होणाऱ्या शाळा प्रत्यक्षात सुरू व्हायला नोव्हेंबरची २३ तारीख उजाडावी लागली. त्यासुद्धा सर्व ठिकाणी सुरू झाल्या नाहीत.  प्राथमिक शाळा तर कुठेच सुरू झाल्या नाहीत. जिथे सुरू झाल्या तिथे फेब्रुवारीअखेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते; पण त्यानंतर करोनाची दुसरी लाट आली आणि सुरू असलेल्या शाळाही बंद झाल्या. या वर्षभरात प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मोठय़ा संख्येने मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली. या विद्यार्थ्यांचा वेगळा अभ्यास आणि विचार करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे नक्कीच. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही परीक्षेची तयारी केली आहे, त्यांना परीक्षाच रद्द करून थांबवून ठेवणे, हा त्यांच्यावर अन्याय झाला असता. या कठीण काळात आपण सर्वानीच परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल, या दिशेने प्रयत्न करायला हवेत.’ असे काही शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. 

मुलांची अवस्था तर पिंजऱ्यात असलेल्या पक्षाप्रमाणे झाली. खिडकीजवळ बसून टकमक बघत बसणं. किंवा ज्यांच्या घरात टीव्ही मोबाईल आहेत त्यांच्याशी खेळत बसणं. शहरी व ग्रामीण भागातील जी मुलं ऑनलाईन क्लास अटेंड करत होती ती देखील दररोजच्या ऑनलाईन  अभ्यासाला कंटाळा करायला लागली. पण मुलांच्या ह्या प्रचंड एनर्जीला विधायक वळण देणं गरजेचं आहे. त्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल.  दैनंदिन शालेय पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर अवांतर वाचन करण्याची त्यांना सवय लावावी लागेल. किशोर, चांदोबा, गोष्टींची पुस्तके यांसारखी पुस्तके वाचावयास सुरुवातीस प्रेरित करावे. त्यानंतर हळूहळू आत्मचरित्रे, ऐतिहासिक, वैज्ञानिक पुस्तके वाचावयास सांगावी. त्यांच्याविषयी चर्चा करावी. त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण झाले की आपोआपच त्यांना वाचनाचा व्यासंग जडेल.

डायरी लेखन किंवा रोजनिशी लिहिण्याची सवय देखील मुलांमध्ये वृद्धिंगत करावी जेणेकरून आपले अनुभव त्यांना शब्दबद्ध करता येतील. तसेच लेखनाचा देखील सराव होईल.

महाभारतातील एकलव्याचे उदाहरण मला या परिस्थितीत समर्पक वाटते. स्वअभ्यासाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील एकलव्य होईल. एकलव्याने आपल्या गुरूच्या अनुपस्थितीमध्ये स्व-अभ्यास करून धनुर्विद्या प्राप्त केली व तो त्यात पारंगत झाला होता. आताच्या परिस्थितीमध्ये शिक्षक मुलांसोबत नसताना त्यांना  स्वअभ्यासाची एक मोठी संधी आहे. त्याचबरोबर तसं पाहिलं तर शाळेमध्ये, क्लासमध्ये जाण्यासाठी लागणारा आपला वेळ हा त्यांना वाचन पाठांतर यांसारख्या विधायक कामांसाठी लावता येईल.

आपल्या मुलांची मनस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना त्यांचे छंद जोपासायला मदत करावी लागेल. एखादे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट (बासरी, तबला, हार्मोनियम, ऑर्गन इ.) वाजवण्यास, गायन करण्यास, चित्रकाम, रंगकाम, मातीकाम कोलाज, कागदाची नक्षी, कथाकथन, अभिनय इ. करण्यास मुलांना व्यस्त ठेवावे. त्यांना तशा संधी उपलब्ध करुन द्याव्यात.  त्यांना त्यांची आवड जोपासण्यास त्यांना प्रेरणा द्यावी. निसर्गाचं, पानाफुलांचं, पशुपक्षांचं इ.च निरीक्षण करण्यास मुलांना प्रेरणा द्यावी. छोटेछोटे वैज्ञानिक प्रयोग करण्यास व खेळणी तयार करण्यास, तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे इ. ना प्रेरणा द्यावी. 

ज्यांना शक्य आहे व ज्यांच्याकडे कॉम्पुटर, मोबाईल उपलब्ध आहे त्या पालकांनी आपल्या मुलांना कोडींग सारखे नवीन कौशल्य देखील शिकवायला हरकत नाही. पण हे करतांना त्यांचा स्क्रीन टाईम अति वाढणार नाही याची देखील दक्षता घ्यावी.

तसं पाहिलं तर डोरेमॉन, भीम यांसारख्या  कार्टून युक्त मालिकांमधून देखील विद्यार्थ्यांवर एक चांगला प्रभाव पडत असतो. एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या या मुलांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची प्रचंड आवड व आकर्षण असतं. एक पालक म्हणून आपण त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. खरंतर या काही  मधून अनेक मॉरल स्टोरीज, चांगलं कसं वागावं किंवा आपण दुसऱ्यांना मदत कशी करावी किंवा एखादी कठीण व आव्हानात्मक परिस्थिती असेल तर त्या वेळेस आपण इतरांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे सर्व मुलं शिकत असतात. त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन देखील विकसित होण्यास मदत होते. असंख्य साहस कथा त्या मध्ये समाविष्ट आहेत. त्यातून चांगल्या गोष्टीचा विजय होत असतो आणि वाईट व चुकीच्या गोष्टी करतो तर त्या चुकीच्या असल्याने त्या टाळाव्यात हे देखील मुलं शिकत असतात. त्यांना त्यातून परावृत्त न करता आपण त्यांच्यासोबत बसून त्या पहाव्यात. त्यांना हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण सांगू शकतो की तू जर भीम असता तर काय केलं असतं? असे प्रश्न विचारून त्यांना विचार करायला लागले तर त्यांच्या विचार शक्तीस चालना मिळून मुलं क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागतील. 

 त्याचबरोबर ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या जीवनपटावर एक मालिका आहे ज्यात  प्रत्यक्ष बाबा साहेबांचा जीवनपट उलगडला आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि पुढे गेले. आणि पुढे जाऊन ते घटनेचे शिल्पकार झाले आणि या सगळ्या बाबी  मुलांना खुप काही शिकवत असतात. त्यांचं बालपण दाखवलं जायचं त्यामध्ये बाबासाहेबांना असणारी पुस्तकांची आवड मुलांना खूप प्रेरित करते. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ तसेच  ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकांनी  तर इतिहास जिवंत केलेला आहे. या सगळ्या बाबी आवडीने मुलं पाहत असतात. त्यातूनही शिकत असतात आता या सुटीच्या काळामध्ये यातूनही मुलांचे शिक्षण होत असतं 

तर रामायण आणि महाभारत यांचे जुने एपिसोड लहान मुले देखील खूप उत्सुकतेने पाहत असतात. आता हे  एपिसोड्स पाहून बऱ्याच जणांचे ते पूर्ण रामायण महाभारत कथा बघून झाले. त्यांनी ते वाचून समजून घेतले असते का तर ते सांगता येत नाही. पण यातून मात्र ते त्यांच्या मनःपटलावर बिंबवले गेले कारण ऑडिओ व्हिजुअल प्रभाव चांगला होत असतो. यातून  भाषादेखील आपसूकपणे ही मुलं शिकत आहेत. पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्याला त्यांची ही अभिरुची आणि त्यांनी घेतलेले शिक्षण ही एक पालक म्हणून किंवा  त्यांना प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणून आपण त्यांना पुढचं देता येईल का? विविध भूमिकाभिनय अथवा नाटयीकरण करण्यास प्रोत्साहन दिले तर त्यातूनही मुलांचं शिक्षण होत असतं. 

खरंतर कोविडने बऱ्याच अडचणी, आव्हाने निर्माण केली परतू त्याचसोबत बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या. समायोजन करायला शिकवलं, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावल्या,  मुलांना स्वअभ्यास करून बऱ्याचशा गोष्टी ज्ञात करून घ्यायला एक संधी देखील निर्माण झाली आहे. फावल्या वेळात  मुलं पालकांना त्यांच्या कामात, घरकामात मदत करतात हे देखील शिक्षणच आहे. हे आपण जाणले पाहिजे. आता फक्त आपण आपल्या अपेक्षा मुलांवर न लादता पालक म्हणून त्यांना समजून घ्यावं. त्यांचे मित्र बनून त्यांच्या आवडी निवडीच्या क्षेत्रात त्यांना अधिक संधी व साधने उपलब्ध करावीत. शक्य तेथे त्यांच्या शिक्षकांची मदत घ्यावी.  परीक्षा हे विद्यार्थी काय शिकले किंवा त्यांनी कोणत्या क्षमता प्राप्त केल्या यांचे मापन करण्याचे एक साधन आहे, ते साध्य नाही हे देखील आपण लक्षात घ्यावे. अनौपचारिक माध्यमांतून देखील मुलं शिकत असतात. 


श्री. शरद लक्ष्मण पांढरे, शहापूर


मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

मला लाभलेले शिक्षक

  

Prakash Mali Sir


⭐At Post Kem, 

Taluka  Karmala, 

Dist. Solapur


Date of Birth1/6/1952

⭐Mcom,D.H.E. Mphil

Ness Wadia College Pune.

⭐(15/7/1977

- 30/6/1984)

G.V. Khade Vidyalay   Shahapur.(Junior College)

⭐(1/7/1985-31/5/2014) 

Sonubhau Baswant College Shahapur-Profesor,Head Dept. ofCommerce, Vice Principal,&Principal 

(1/6/1999-31/5/04)

M.K. Degree College

Kalyan(5/6/2014-31/3/2020)Total experience-44Years⭐

[10/10, 18:52] SB Mali Prakash Sir: I have given more importance to students in my life.

My attitude was that student is the center point of education system. Therefore we implimented all activities on the basis of this thought.

💐Awards-1) Best Teacher award by Lions club Shahapur


Note- Best College Award by University of Mumbai in 2008-09

🌿Best Schemes 1)

Adimission at Rupes 1

- We have given Admission to poor , needy and brilliant students at Rupes 1.

This came was apreciated by NAAC commitee as a best scheme in India. 

2)  Advance Teaching Method - We have started Advance Teaching Method (I.C.T) Instead of Traditional Teaching Method ( Black board and duster method)

🌿शिक्षणात आपण केलेले प्रयोगः Classification of Learners (students)

-We Classified Learners into 3 groups 1-Advance Learners 

- We have given special coaching to advance learners to bring up them.

2- Average Learners 

3- Slow Learners 

- We have given aditional teaching to slow learners to bring up them at the par of Average Learners .

Through this system we developed majority learners




2) We have given personel attention to S.T students. Near about 35%  students was S.T students in the College.

🌿अविस्मरणीय उल्लेखनीय अनुभव

I financialy helped many S.T. students at the time of admission.

There was my personel attention to one S.T female  student as like my daughter. I financialy help her many times, but condition was that she should be pass in every exam in first class up to the .completion of education and now she is working in goveroment department.

 🌿 Changes in Education System - suggestions  1) Common students keep them on right education track . But it is more responsibility of teachers to keep every abnormal students on the right track. For this teachers should have to keep close contact and personal attention with abnormal students , take them into confidence,  guide them properly and keep them on right education track. 2) Primary education is the foundation of secondary and higher education. It is suggested to primary teachers to give proper attention to  each and every students as like own child and create education interest and confidence among the students, if this happen students will proceed with confidence and will develop themselves  3) syllabus of secondary School should be on competitive exam base as like Syllabus of U.P.and Bihar. Therefore students will appear competitive exam easily and with confidence.

🌿(Past and present students) In today's competitive world 

parents are career oriented and students are exam oriented. Both ignore personality development.It make negative impact on personality development of the students. Also excess use of TV and mobile by the students make adverse effect on the alround development . At present it is the responsibility of the teachers and parents that students should divert from TV and mobile to sports and cultural activities. It is necessary for the all round development of the students

 Past students gave equal importance to academic performance and personality development .The personality of the past students was very good. There was limited use of TV by the students and there was no question of mobile use.Therefore past students gave maximum time for sports and cultural activities. Good personality helped to built strong confidence and the result was that past students achieved  targets easily even though they were difficult.

 (Past schools and present schools) In past there was traditional system of education. Infrastructure was limited and educational resources were negligible .There was limited scope to Co-cullar  activities. In other words there was little scope to past students for the development . 

Today even in rural area majority  schools are digital schools. In digital schools teaching method is advance which create education interest among the students. Today there is a lot of scope to students for the development. 

( Other special experiences) when I was principal  of  Sonubhau Baswant College Shahapur, we jointly organised various social activities with voluntary organisations like Lions Club Shahapur , Rotary club etc Such activities were Cataract operation and  Eye check-up camp, blood donation camp, dental check up camp etc.There was a practice of Lions Club Shahapur every year they arranged Cataract operation and Eye check up camp at the end of December every year in Shahapur. In which our students worked as volunteers. They gave wholehearted services to patients . Such activities create  social and national spirit among the students.  If these opportunities provided to the students it will be useful to create good citizens in the society.


मला लाभलेले उत्कृष्ट शिक्षक


Degree College 

सोनुभाऊ बसवंत 

 1) प्राचार्य श्री प्रकाश माळी सर

2) प्रा. भालचंद्र वाकचौरे सर

3) प्रा. दीपक शिंदे सर



गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा



माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा
                                                                    --  श्री. शरद लक्ष्मण पांढरे


कवी केशवकुमार म्हणतात,
"ही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी | आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||"

 माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा ही विद्यार्थ्यांना स्वअध्यायनास प्रेरणा देणारी असावी. जेथे विद्यार्थी हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जावेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, तंत्रज्ञान, नेतृत्व राष्ट्रभक्ती तसेच सामाजिक गुणांचा विकास होण्यासाठी तसेच मूल्यशिक्षण मिळण्यासाठी उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांमध्ये auditory, visual, तसेच kinesthetic learners  असतात व त्यांच्यामध्ये individual differences असतात याचे भान ठेवून अध्ययन अध्यापन प्रक्रिया कार्यान्वित केली जाते. तसेच मुलांमधील बहुबुद्धिमत्तेचा (Multiple intelligence) वापर देखील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत व्हावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकमेव-द्वितीय व्यक्तिमत्व (Unique Personality) असते याच भान असणारी शाळा असेल. त्याचबरोबर समावेशक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा बुद्धयांक, शारीरिक दोष (Physical disorder) यांची जाण प्रत्येक घटकाला आहे.
        विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून कृतीयुक्त शिक्षणास वाव दिला जातो. तसेच अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रमांचे उपचारात्मक अध्यापनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 जेथे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर करण्यात येतो. (Judicious use of Technology).  ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कुल, ABL(Activity Based Learning), collaborative learning तसेच पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण यांची सांगड घालून आनंददायी शिक्षण दिले जाते. भविष्याचा वेध घेऊन शिक्षण दिले जाते त्यासाठी नवनवीन तंत्रे आत्मसात केली जातात.
विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्तीस पुरेसा वाव दिला जातो.  विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती जागृत करून त्यांना विविध प्रयोग, निरीक्षण, चर्चा, शोध घेण्यास पुरेसा वाव दिला जातो. कारण Curiosity is the mother of invention.
          जेथे विद्यार्थ्यांना आव्हाने (Challenges) दिली जातात. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते अधिक प्रयत्न करतील व स्वतः सक्षम व जबाबदार होतील. त्याचबरोबर मुलांची संवेदनशीलता जोपासली जाते. आव्हानांमध्ये (Challenges) मध्ये संधी (opportunity) शोधणे वा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.
      विद्यार्थ्यांच्या creativity ला पुरेसा वाव मिळायला हवा. नवनिर्मिती प्रक्रियेस चालना देणारे शिक्षण तेथे मिळायला हवे.
       समीक्षणात्मक विचार (critical thinking), नवनिर्मिती विचार (Creative Thinking), सहकार्यातून शिक्षण Collaborative learning, संभाषण कौशल्ये(Conversation skills), संप्रेषण कौशल्ये (communication skills) इ. 21व्या शतकातील कौशल्ये व विचार वृद्धिंगत होणारे शिक्षण दिले जाते.
       जीवन कौशल्यांचे शिक्षण, किशोरवयीन मुलांसाठीचे शिक्षण त्यांना शाळेतून मिळत असेल. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता या गोष्टीला प्राधान्य देण्यात येते. जेथे विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक सुरक्षितता जोपासली जाते.
एक उत्तम माणूस व आदर्श नागरिक बनण्याचे धडे सहजपणे विद्यार्थ्यांना मिळतील. स्वयंशिस्त तसेच स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवलेल्या असतील हे कटाक्षाने पाहिलं जातं.
       शाळेमधील वातावरण हे लोकशाही स्वरूपाचे असावे. प्रत्येक विद्यार्थ्याला मत मांडण्यास स्वातंत्र्य मिळावे. तसेच शिक्षकांना देखील त्यांचे मत मांडायला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यास स्वातंत्र्य हवे. त्यांचे वर्ग व पाठ निरीक्षण करून त्यांना प्रेरणादायी व constructive feedback द्यायला हवा. कुणालाही अपमानास्पद वागणूक मिळत नाही.
शिकण्यासाठी पोषक शालेय वातावरण (school ecosystem) निर्माण केले आहे.  मुलांना प्रसन्न वाटेल, त्यांना हवेहवेसे वाटेल असे शालेय वातावरण त्यांना मिळायला हवे.  त्यामध्ये सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शालेय बागबगीचे, क्रीडांगण, व्यायामशाळा, डिजिटल classroom इ., पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, शैक्षणिक साधने, उत्तम निवास व भोजनव्यवस्था असेल.
        जेथे उपलब्ध परिस्थितीतील, उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर करून उत्तम शिक्षण दिले जाते. (Maximum utilization of the available resources.)
      उत्तम दर्जाचे, मूल समजून घेणारे, आईच्या मायेने त्यांना प्रेम देणारे, स्वतःला झोकून देऊन काम करणारे स्वयंप्रेरित  (Self motivated), स्वतःला नेहमी बदलत्या काळानुसार update करणारे शिक्षक, कर्मचारी व मुख्याध्यापक असायला हवे. प्रेरणादायी नेतृत्व मुख्याध्यापक आहेत.
            मला वाटतं शाळेत शिक्षकाला कोणती जात- धर्म - पंथ नसतो. शिक्षक हीच त्याची जात असते व तोच त्याचा धर्म. विद्यार्थी हेच त्याचे दैवत व शाळा हीच त्याचे प्रार्थनास्थळ! शिक्षक हा वैश्विक (Universal) असतो याचं भान व गुणवत्ता हा त्याचा ध्यास असतो याची जाण प्रत्येकाला असेल.
       शाळेच्या प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतात- जसे क्रीडांगण विकास, बागबगीचे निर्मिती, वृक्षारोपण, परसबाग, शालेय व परिसर स्वच्छता.  त्यांचा सहभाग घेतला जातो व त्यामुळे शाश्वत विकासासाठी (sustainable development) मदत होते.
        प्रत्येक बाबीसाठी केवळ शासनावर विसंबून न राहता सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्याचबरोबर पालक व समाजाचा सहभाग घेतला जातो. तसेच विविध सामाजिक संस्थांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले जातील. शक्य तेथे CSR च्या माध्यमातून मदत मिळवावी इ. कडे लक्ष दिले जाते.
       निसर्ग व पर्यावरण हे सर्वात मोठे गुरु आहेत म्हणून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळून पर्यावरण विषयक जागृती निर्माण होणारे शिक्षण हवे. वैज्ञानिक अभिरुची व दृष्टीकोन विकसित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.
       जेथे विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून शिकवले जाते  व हे करतांना फक्त पाठयपुस्तक शिकवले म्हणजे झाले असे न करता पाठयपुस्तका व्यतिरिक्त मुलांनी इतर ठिकाणाहून देखील भाषा शिकण्याच्या संधी मिळतात जसे वृत्तपत्रे, दूरदर्शनच्या बातम्या, खेळांची कॉमेंटरी, चित्रपट इ. गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा देखील अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत वापर केला जातो.
त्याचबरोबर शक्य झाल्यास इतर भाषा देखील शिकण्याच्या संधी उपलब्ध केल्या जातात. जेथे भाषा शिकण्याच्या नैसर्गिक पद्धती अवलंब केला जातो. ग्लोबल महत्व लक्षात घेऊन आपल्याच माध्यमातून इंग्रजी शिकण्यास पुरेसा वाव दिला जातो. परिसरातून शिकण्यास वाव दिला जातो.
           विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी विविध उपक्रम जसे मुक्त ग्रंथालय इ., डिजिटल लायब्ररी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना शक्य झाल्यास अन्य शहरातील, राज्यातील किंवा देशांतील शाळांतील वर्गांशी जोडलेला आहे. म्हणजे इतर मुले अशी शिकतात हेही त्यांना कळण्यास मदत होते. त्याचबरोबर whatsapp video च्या माध्यमातून किंवा अन्य अँपचा वापर करून इतर तज्ज्ञ शिक्षक, वैज्ञानिक यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या संधी मिळतात. शाळेत विविध कार्यशाळा, शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन यांचे नियमित आयोजन करण्यात येते.
       जेथे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचे जग अनुभवण्यास देण्यासाठी विविध शैक्षणिक सहली तसेच परिसर सहलींचे आयोजन केले जाते. स्व अनुभूती दिल्या जातात. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्व विकास, स्वसंरक्षण तसेच व्यवसाय शिक्षण व इतर संधी देखील शाळेतून उपलब्ध होतात. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
     विविध विषयांची सांगड घालून शिक्षण (Correlation with other subjects) देण्यात येते. जसे की विज्ञान, समाजशास्त्र व गणित शिकतांना भाषा देखील आपसूकपणे शिकतील. तसेच कला, कार्यानुभव, तसेच प्रयोगांचे सादरीकरण करतांना भाषिक अभिव्यक्तीस संधी दिल्या जातात.
       जी माणसाला माणसाप्रमाणे माणूस म्हणून जगायला शिकवणारी व माणुसकीचा मळा फुलवणारी,  अशी माझ्या दृष्टिकोनातील व स्वप्नातील शाळा आहे.
                                                 श्री. शरद लक्ष्मण पांढरे
माध्यमिक शिक्षक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिवळी, ता. शहापूर, जि. ठाणे. 9270257902

     

शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

8th std training for teachers

Revised textbooks of std eight
Revised Curriculum And Textbook.
Teachers Training Program 2018-2019.
Training on Jio tv and Vande Gujrat
विषय गणित  - इयत्ता ८ वी पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सन २०१८-२०१९
https://youtu.be/LDpNff7YItM


इंग्रजी
प्रशिक्षण इयत्ता 8 वी
सौजन्य वंदे गुजरात
https://youtu.be/pZ1hRzMPk98


विषय विज्ञान - इयत्ता ८ वी* पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सन २०१८-२०१९
https://youtu.be/C4K8PTVGyVw


*विषय इतिहास  - इयत्ता ८ वी पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक*
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सन २०१८-२०१९
https://youtu.be/MF-SAUwY8hE


*
विषय भूगोल   - इयत्ता ८ वी* पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सन २०१८-२०१९
* https://youtu.be/0XWe7_bPrB


*पुनरर्चित पाठयपुस्तक प्रशिक्षण इयत्ता 8वी महाराष्ट्र*
हिंदी  
https://youtu.be/znX_e6yf4es
     इयत्ता ८ वी पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक

मंगळवार, १० जुलै, २०१८

रेल्वेतील फेरीवाला शाळकरी मुलगा





रेल्वेतील फेरीवाला शाळकरी मुलगा



           नेहमीप्रमाणे मी पुण्याहून इंद्रायनीने घरी परतत होतो. खंडाळा स्टेशन गेल्यानंतर सावळ्या रंगाचा, मळकट पिवळा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातलेला एक फेरीवाला मुलगा भेदरलेल्या अवस्थेत हुंदके देत रडतांना दिसला. अधून मधून तो मागे पहात होता. मी  त्याला विचारले की तू का रडतोस? त्यावर तो मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाला "पोलिसाने माझे १०० रु घेतले", व पुन्हा रडायला लागला. मी त्याला म्हटले अरे मग रडतोस काय? नकळत माझा हात खिशाकडे गेला व मी त्याला खिशातून १०० रु काढून देऊ केले. पण सुरुवातीला त्याने घेतले नाही. माझ्यासोबतचे सहप्रवासी अवाक होऊन माझ्याकडे बघत होते व त्यांनीही त्याला पैसे देऊ केले. पण तो टॉयलेटच्या बाजूला कोपऱ्यात जाऊन बसला. पण त्याची नजर मात्र सारखी त्या पोलिसाकडे होती.
                मी मात्र अस्वस्थ होतो. मनोमन त्या पोलिसाबद्दल राग व्यक्त करत होतो. त्या मुलाने रबर विकून कमावलेले 100 रु ही त्याने हिसकावून घ्यावेत. त्याचा खूप रागही आला.
मला राहवलं नाही . मी पुन्हा त्या मुलाला बोलावून घेतले. तेव्हा त्याने सांगितले की तो पोलीस त्याच्याकडे ५००रु हप्ता मागत होता. व शाळेला सुट्ट्या असल्याने तो सुट्टीत आईला मदत व्हावी म्हणून हे काम करत आहे व आजचा त्याचा पहिलाच दिवस व त्याने तासभर रबर विकून कमावलेले १०० रु देखील त्या पोलिसाने घेतले.
५०० रु चा मालच होता त्यातलेही त्याने घेतले घरी बहीण आजारी, खायला काय नेऊ म्हणत पुन्हा रडायला लागला.
            माझ्या खिशात एक हजार रुपयेच होते. पण तरीही मी ५००रु खिशातून काढून त्याच्याकडच्या  वस्तू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे दिले. तो अवाकच झाला पण मग बाकीचे प्रवासीही 20-30 रु काढून त्याच्या वस्तू घेऊ लागले, तसे पाहिले तर मला व त्यांनाही त्या वस्तूंची गरजच नव्हती. पण त्या क्षणी मलाही इतर काही सुचले नाही. माझ्यातील शिक्षकाला त्या मुलाची व्यथा पहावली नाही.
          प्रश्न वस्तू घेण्याचा नव्हताच. पण प्रामाणिकपणे कुटुंबाच्या मदतीसाठी हे काम करणारा, कदाचित system बद्दल तिटकारा येऊन तो शाळकरी मुलगा पॉकेटमारी कडे वळला असता किंवा इतर काही चुकीचे वागला असता. सर्व वस्तू विकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
मी त्याला नाव विचारले तेव्हा त्याने सांगितले "कचमल लाखन प्रकाश."
मी  विचारले, "कुठला तू?"
तो म्हणाला,"आंध्रप्रदेशचा!"
मी विचारले,"इकडे कुठे राहतोस?"
तो म्हणाला, "ठाण्याला!"
मी विचारले,"शाळेत कितवीला आहेस?"
तो म्हणाला, "नववीत, तेलगू माध्यमात!"
             त्याला म्हटले परिस्थितीने खचून जाऊ नकोस. असे प्रसंग तर जीवनात येतच राहतील. रेल्वेत वस्तू विकण्यापेक्षा काही वेगळे काम करून शाळा शिक.   बाजूचे प्रवासी निशब्द होऊन माझ्याकडे पहातच राहिले. जवळच्यांना तर सर्वच मदत करतात. पण केवळ माणुसकी म्हणून त्याला मी केलेली मदत त्यांनाही त्याच्या वस्तू घेण्यावाचून रोखू शकली नाही. एवढा वेळ उभा असूनही तसूभरही न हळणाऱ्या प्रवाशांनी चक्क मला बसायला जागा तर दिलीच पण आदराने विचारपूस करू लागले. मग गप्पा रंगल्या.
त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य डोळ्यांमध्ये साठवून मी कल्याणला उतरलो व आसनगाव ट्रेनने घरी परतलो. त्या वस्तू आमच्या शाळेतील छोट्या आदिवासी मुलींना वाटल्या तेव्हा तो आनंद अधिकच द्विगुणित झाला. अजूनही त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या बदललेल्या छटा व त्याच्या डोळ्यांमधले कृतज्ञतेचे भाव मला खूप आनंद देऊन जातात.


शरद पांढरे
05जून 2018

शनिवार, १९ मे, २०१८

बदलत्या काळाची गरज: ज्ञानरचनावाद,Activity Based Learning, Collaborative Learning व Digital School यांची सांगड



माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा
                                                                    --  श्री. शरद लक्ष्मण पांढरे


कवी केशवकुमार म्हणतात,
"ही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी | आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||"

 माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा ही विद्यार्थ्यांना स्वअध्यायनास प्रेरणा देणारी असावी. जेथे विद्यार्थी हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जावेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, तंत्रज्ञान, नेतृत्व राष्ट्रभक्ती तसेच सामाजिक गुणांचा विकास होण्यासाठी तसेच मूल्यशिक्षण मिळण्यासाठी उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांमध्ये auditory, visual, तसेच kinesthetic learners  असतात व त्यांच्यामध्ये individual differences असतात याचे भान ठेवून अध्ययन अध्यापन प्रक्रिया कार्यान्वित केली जाते. तसेच मुलांमधील बहुबुद्धिमत्तेचा (Multiple intelligence) वापर देखील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत व्हावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकमेव-द्वितीय व्यक्तिमत्व (Unique Personality) असते याच भान असणारी शाळा असेल. त्याचबरोबर समावेशक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा बुद्धयांक, शारीरिक दोष (Physical disorder) यांची जाण प्रत्येक घटकाला आहे.
        विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून कृतीयुक्त शिक्षणास वाव दिला जातो. तसेच अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रमांचे उपचारात्मक अध्यापनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 जेथे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर करण्यात येतो. (Judicious use of Technology).  ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कुल, ABL(Activity Based Learning), collaborative learning तसेच पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण यांची सांगड घालून आनंददायी शिक्षण दिले जाते. भविष्याचा वेध घेऊन शिक्षण दिले जाते त्यासाठी नवनवीन तंत्रे आत्मसात केली जातात.
विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्तीस पुरेसा वाव दिला जातो.  विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती जागृत करून त्यांना विविध प्रयोग, निरीक्षण, चर्चा, शोध घेण्यास पुरेसा वाव दिला जातो. कारण Curiosity is the mother of invention.
          जेथे विद्यार्थ्यांना आव्हाने (Challenges) दिली जातात. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते अधिक प्रयत्न करतील व स्वतः सक्षम व जबाबदार होतील. त्याचबरोबर मुलांची संवेदनशीलता जोपासली जाते. आव्हानांमध्ये (Challenges) मध्ये संधी (opportunity) शोधणे वा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.
      विद्यार्थ्यांच्या creativity ला पुरेसा वाव मिळायला हवा. नवनिर्मिती प्रक्रियेस चालना देणारे शिक्षण तेथे मिळायला हवे.
       समीक्षणात्मक विचार (critical thinking), नवनिर्मिती विचार (Creative Thinking), सहकार्यातून शिक्षण Collaborative learning, संभाषण कौशल्ये(Conversation skills), संप्रेषण कौशल्ये (communication skills) इ. 21व्या शतकातील कौशल्ये व विचार वृद्धिंगत होणारे शिक्षण दिले जाते.
       जीवन कौशल्यांचे शिक्षण, किशोरवयीन मुलांसाठीचे शिक्षण त्यांना शाळेतून मिळत असेल. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता या गोष्टीला प्राधान्य देण्यात येते. जेथे विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक सुरक्षितता जोपासली जाते.
एक उत्तम माणूस व आदर्श नागरिक बनण्याचे धडे सहजपणे विद्यार्थ्यांना मिळतील. स्वयंशिस्त तसेच स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवलेल्या असतील हे कटाक्षाने पाहिलं जातं.
       शाळेमधील वातावरण हे लोकशाही स्वरूपाचे असावे. प्रत्येक विद्यार्थ्याला मत मांडण्यास स्वातंत्र्य मिळावे. तसेच शिक्षकांना देखील त्यांचे मत मांडायला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यास स्वातंत्र्य हवे. त्यांचे वर्ग व पाठ निरीक्षण करून त्यांना प्रेरणादायी व constructive feedback द्यायला हवा. कुणालाही अपमानास्पद वागणूक मिळत नाही.
शिकण्यासाठी पोषक शालेय वातावरण (school ecosystem) निर्माण केले आहे.  मुलांना प्रसन्न वाटेल, त्यांना हवेहवेसे वाटेल असे शालेय वातावरण त्यांना मिळायला हवे.  त्यामध्ये सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शालेय बागबगीचे, क्रीडांगण, व्यायामशाळा, डिजिटल classroom इ., पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, शैक्षणिक साधने, उत्तम निवास व भोजनव्यवस्था असेल.
        जेथे उपलब्ध परिस्थितीतील, उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर करून उत्तम शिक्षण दिले जाते. (Maximum utilization of the available resources.)
      उत्तम दर्जाचे, मूल समजून घेणारे, आईच्या मायेने त्यांना प्रेम देणारे, स्वतःला झोकून देऊन काम करणारे स्वयंप्रेरित  (Self motivated), स्वतःला नेहमी बदलत्या काळानुसार update करणारे शिक्षक, कर्मचारी व मुख्याध्यापक असायला हवे. प्रेरणादायी नेतृत्व मुख्याध्यापक आहेत.
            मला वाटतं शाळेत शिक्षकाला कोणती जात- धर्म - पंथ नसतो. शिक्षक हीच त्याची जात असते व तोच त्याचा धर्म. विद्यार्थी हेच त्याचे दैवत व शाळा हीच त्याचे प्रार्थनास्थळ! शिक्षक हा वैश्विक (Universal) असतो याचं भान व गुणवत्ता हा त्याचा ध्यास असतो याची जाण प्रत्येकाला असेल.
       शाळेच्या प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतात- जसे क्रीडांगण विकास, बागबगीचे निर्मिती, वृक्षारोपण, परसबाग, शालेय व परिसर स्वच्छता.  त्यांचा सहभाग घेतला जातो व त्यामुळे शाश्वत विकासासाठी (sustainable development) मदत होते.
        प्रत्येक बाबीसाठी केवळ शासनावर विसंबून न राहता सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्याचबरोबर पालक व समाजाचा सहभाग घेतला जातो. तसेच विविध सामाजिक संस्थांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले जातील. शक्य तेथे CSR च्या माध्यमातून मदत मिळवावी इ. कडे लक्ष दिले जाते.
       निसर्ग व पर्यावरण हे सर्वात मोठे गुरु आहेत म्हणून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळून पर्यावरण विषयक जागृती निर्माण होणारे शिक्षण हवे. वैज्ञानिक अभिरुची व दृष्टीकोन विकसित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.
       जेथे विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून शिकवले जाते  व हे करतांना फक्त पाठयपुस्तक शिकवले म्हणजे झाले असे न करता पाठयपुस्तका व्यतिरिक्त मुलांनी इतर ठिकाणाहून देखील भाषा शिकण्याच्या संधी मिळतात जसे वृत्तपत्रे, दूरदर्शनच्या बातम्या, खेळांची कॉमेंटरी, चित्रपट इ. गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा देखील अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत वापर केला जातो.
त्याचबरोबर शक्य झाल्यास इतर भाषा देखील शिकण्याच्या संधी उपलब्ध केल्या जातात. जेथे भाषा शिकण्याच्या नैसर्गिक पद्धती अवलंब केला जातो. ग्लोबल महत्व लक्षात घेऊन आपल्याच माध्यमातून इंग्रजी शिकण्यास पुरेसा वाव दिला जातो. परिसरातून शिकण्यास वाव दिला जातो.
           विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी विविध उपक्रम जसे मुक्त ग्रंथालय इ., डिजिटल लायब्ररी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना शक्य झाल्यास अन्य शहरातील, राज्यातील किंवा देशांतील शाळांतील वर्गांशी जोडलेला आहे. म्हणजे इतर मुले अशी शिकतात हेही त्यांना कळण्यास मदत होते. त्याचबरोबर whatsapp video च्या माध्यमातून किंवा अन्य अँपचा वापर करून इतर तज्ज्ञ शिक्षक, वैज्ञानिक यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या संधी मिळतात. शाळेत विविध कार्यशाळा, शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन यांचे नियमित आयोजन करण्यात येते.
       जेथे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचे जग अनुभवण्यास देण्यासाठी विविध शैक्षणिक सहली तसेच परिसर सहलींचे आयोजन केले जाते. स्व अनुभूती दिल्या जातात. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्व विकास, स्वसंरक्षण तसेच व्यवसाय शिक्षण व इतर संधी देखील शाळेतून उपलब्ध होतात. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
     विविध विषयांची सांगड घालून शिक्षण (Correlation with other subjects) देण्यात येते. जसे की विज्ञान, समाजशास्त्र व गणित शिकतांना भाषा देखील आपसूकपणे शिकतील. तसेच कला, कार्यानुभव, तसेच प्रयोगांचे सादरीकरण करतांना भाषिक अभिव्यक्तीस संधी दिल्या जातात.
       जी माणसाला माणसाप्रमाणे माणूस म्हणून जगायला शिकवणारी व माणुसकीचा मळा फुलवणारी,  अशी माझ्या दृष्टिकोनातील व स्वप्नातील शाळा आहे.
                                                 श्री. शरद लक्ष्मण पांढरे
माध्यमिक शिक्षक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिवळी, ता. शहापूर, जि. ठाणे. 9270257902

     

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

इ 8 वी मराठी कविता काव्यवाचन

इयत्ता 6 वी मराठी कविता

गवत फुला रे गवत फुला
https://youtu.be/yPxSltz0JAA

माय
https://youtu.be/yHatw3jfIrA


असा रंगारी श्रावण काव्यवाचन 
https://youtu.be/g4N_sC6ZQwA

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

सेमी- इंग्रजी "काल, आज व उद्या 

सेमी- इंग्रजी "काल, आज व उद्या                  

                                                                         -         शरद लक्ष्मण   पांढरे 
                        
                        शिक्षण प्रक्रियेत भाषेला अनन्य साधारण महत्व आहे कारण भाषेतून संस्कृती झिरपत असते. म्हणूनच प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. खरंतर शिक्षण ही देण्यापेक्षा घेण्याची कला आहे. 21 व्या शतकात वाटचाल करत असतांना मात्र अचानक पालकांचा रोख इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे सुरु झाला. मशरूम प्रमाणे या शाळांची संख्या वाढू लागली. 'येरे येरे पावसाची' जागा 'Rain rain, go to Spain' ने घेतली. मराठी माध्यमाच्या शाळांच्या गजबजलेल्या तुकड्या धडाधड बंद होऊ लागल्या अन सुरु झाली लढाई अस्तित्व टिकवण्याची....  दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केवळ काही पालकांनी प्रतिष्ठेपायी दाखल केलेल्या काही मुलांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली.
                    
एकीकडे इंग्रजीचे वाढते महत्व, तर दुसरीकडे भाषा व संस्कृती यांची लढाई ... या पार्श्वभूमीवर सेमी इंग्रजी हा उत्तम पर्याय म्हणून उभा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही bilingual medium of education याला महत्व दिलेले आहे. सेमी इंग्रजी मध्ये विज्ञान व गणित हे विषय फक्त इंग्रजीतून व इतर विषय मातृभाषेतून दिलेले असतात. १९६५ पासून केंद्रीय विद्यालये१९८६ पासून नवोदय विद्यालयातून सेमी इंग्रजी सुरु झाले. अर्थात त्यामध्ये हिंदी व इंग्रजी या भाषांचा प्रामुख्याने समावेश होता. १९८० च्या दशकात ८ वी पासून सेमी इंग्रजीला सुरुवात झाली२००४ पासून पाचवी पासून, तर  साधारणतः  २०१० पासून पहिलीपासून सेमी इंग्रजीला महाराष्ट्रात सुरुवात झाली.
                      मागच्या महिन्यातच या विषयावर एका शिक्षण परिषदेचे आयोजन माजी शिक्षण संचालक आदरणीय वसंत काळपांडे सरांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यामध्ये विविध तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
                     विद्यार्थ्यांमध्ये
 आत्मविश्वास  निर्माण करण्यासाठी, मुलांचे गणित व विज्ञानातील संबोध अधिक स्पष्ट व्हावेत, समाजपूर्वक वाचन, लेखन व आकलनासाठी, उच्च शिक्षणासाठी, मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, पालक व विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, इंग्रजी माध्यमाचे आकर्षण कमी व्हावे इ. साठी सेमी इंग्रजीची गरज आहे. सेमी इंग्रजीचा पर्याय जर पालकांपुढे नसता तर अल्प उत्पन्न गटातील एक मोठा वर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळला असता.
                       
पण केवळ तुकड्या वाचाव्यात म्हणून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करणे योग्य होणार नाही. मुलांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होण्यासाठी सेमी इंग्रजी असायला हवे. पण आम्ही विद्यार्थ्यांना शाळेतून तेवढे exposure देतोय का? क्लासला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? मुलांना तेवढे उत्कृष्ट शिक्षक मिळतात का? गणित व इंग्रजीतील संबोध लहान वर्गांमध्ये मातृभाषेप्रमाणे स्पष्ट होतील का? मुलांचे इंग्रजीतील संभाषण कौशल्य तेवढे चांगले विकसित होईल कायांसारखे अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात.
                        
याचबरोबर कोणत्या इयत्तेपासून माध्यमाची सुरुवात व्हावी हा प्रश्न आहे. अनेक जाणकारांच्या मते पाहिलीपेक्षा पाचवीपासून सेमी इंग्रजीची सुरुवात करावी. जेणेकरून पहिल्या चार वर्गात त्यांचे मूलभूत संबोध मातृभाषेतून अधिक दृढ होतील.
                       
शिक्षण सेवक, अंशदायी पेन्शन योजना सारख्या योजनांमुळे शिक्षण क्षेत्राकडे गुणवंत विद्यार्थी करिअर ऑप्शन म्हणुन पाठ फिरवत असल्याने भविष्यात शिक्षकांची शैक्षणिक पार्श्वभूमी हाही मुद्दा प्रामुख्याने भेडसावणार आहे व तो चिंतेचा विषय ठरू शकेल.
                       
परंतु हे अपवाद वगळता पुढील बाबींचा अवलंब करून आपणांस काही ठोस भूमिका घ्याव्या लागतील. या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तका सोबतच मराठी माध्यमाची विज्ञान व गणिताची पुस्तके simultaneously वाचायला लावावीत. शिकवतांना शक्य तेवढ्या प्रमाणात multi-lingual approach फॉलो करावा. विज्ञान व गणित चे शब्दकोश वापरण्यास मुलांना प्रवृत्त करावे. ज्ञानरचनावादाचा व डिजिटल क्लासरूमचा वापर, शक्य त्या ठिकाणी communicative approach, नाटयीकरण, collaborative learning, क्षेत्रभेटी यांचा अवलंब करावा.
                         
विविध विषयांसोबत सांगड घालून या विषयांचे संबोध स्पष्ट करावेत. सदर वर्गांना दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे शिक्षक नेमावेत. गणित पेटी, विज्ञान कोपरा, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शने आयोजित करून प्रत्येक विद्यार्थ्याला सादरीकरण करण्याच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दोन्ही भाषेत द्यावीत. दहावीपर्यंत अध्यापनात इंग्रजीचा वापर क्रमशः व तारतम्याने वाढवत न्यावा. परिसरातील वनस्पती व वस्तूंना मराठीतील नावांसोबत त्यांचे scientific नाव दर्शविणारे फलक लावावेत. इ. १ ली पासूनच विद्यार्थ्यांची शाळेत इंग्रजी विषयाची व भाषेची तयारी अधिक करून घ्यावी. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा अधिक कौशल्यपूर्ण वापर होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गात वेळोवेळी उपचारात्मक अध्यापन अधिक प्रभावी व्हावे.
 
                              विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा व मातृभाषेचा  देखील स्पष्टीकरण करतांना सुरुवातीस करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रमाणभाषा व इंग्रजी बद्दलची भीती दूर होऊन ते शिकण्यास प्रवृत्त होतील. अभ्यासक्रम आराखड्यातही सदर बाबीचा उल्लेख केलेला आहे.
                         
पालकांची भूमिका देखील आत्ता बदलणे गरजेचे आहे. मुलांना केवळ शाळेत पाठवून दिले म्हणजे आपले काम संपले असे म्हणून चालणार नाही. शिक्षणास पोषक वातावरण घरात देखील निर्माण करावे. टेक्नॉलॉजीचा न्याय्य वापर, शिक्षकांबाबत आदरत्यांना पडलेले विविध प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, स्वअभ्यास करण्यास प्रेरणा देऊन त्यांना आरोग्यदायी सवयी लावाव्यात. अपेक्षांचे अनाठायी ओझे मुलांवर लादू नये. त्यांचे शिक्षण आनंददायी कसे होईल व मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.
                             
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पर्यायांसोबतच आव्हानही येतच असतात. परंतु शहरी तसेच ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांना शाळेतून अधिक प्रमाणात मार्गदर्शन व वाव मिळाल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून सेमी इंग्रजी हा अधिक प्रभावी पर्याय होऊ शकेल.  अर्थात शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने motivation देणे अत्यावश्यक आहे.


     शरद लक्ष्मण पांढरे,
           ९२७०२५७९०२